उद्देश: चंद्रावर मानवाची कायमस्वरूपी उपस्थिती प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.
कार्यपद्धती: हे अंतराळवीर चंद्रावर उतरणार नसून, प्रदक्षिणा घालून यंत्रणांची चाचणी करतील.
विक्रमी प्रवास: ही मोहीम अपोलो-१३ चा अंतराचा विक्रम मोडीत काढू शकते आणि मानवाचा आतापर्यंतचा सर्वात दूरचा प्रवास ठरू शकतो.
परतीचा प्रवास: १० एप्रिल रोजी पृथ्वीवर परतताना त्यांचा वेग प्रचंड असेल, ज्यामुळे ते 'सर्वात वेगवान मानव' ठरू शकतात.